अन् मजुरांनी धूम ठोकली

निवास केंद्रातून पाच मजुरांचा पळ
निवास केंद्रातून पाच मजुरांचा पळ

खोपोली (बातमीदार) : लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील परप्रांतीय मजुरांनी पायीच आपले मूळ गाव गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. पायी जाणाऱ्या 92 मजुरांसाठी खोपोली पोलिस व महसूल विभागाकडून जनता विद्यालयात त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली; मात्र त्यापैकी पाच मजुरांनी मंगळवारी (ता. 14) पळ काढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

या व्यवस्थेची दैनंदिन पाहणीची जबाबदारी तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्यावर होती. जनता विद्यालयात तेलंगणा, कर्नाटक, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र आदी भागांतील एकूण 92 मजूर होते. 14 तारखेनंतर आपल्याला गावी जाता येईल, या आशेवर हे मजूर होते; मात्र दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाल्यावर अजून पुढील 20 दिवस अशाच प्रकारे येथे राहावे लागेल, या चिंतेने मजुरांना ग्रासले आहे. याच चिंतेतून 15 व 16 एप्रिलच्या दरम्यान येथील पाच मजूर पळून गेल्याचे उघड झाले आहे. 

मजूर निवासी केंद्रात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, दैनंदिन आरोग्य तपासणी, नाश्‍ता-चहासह दोन वेळचे पोटभर जेवण देण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली जात आहे. यासाठी महसूल विभागाचा एक अधिकारी, नगरपालिकाचे दोन शिक्षक, एक शिपाई यांची विशेष निवड करण्यात आली आहे.

उपपोलिस अधीक्षक डॉ. रणजित पाटील, तहसीलदार इरेश चप्पलवार, मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याकडून दररोज अहवाल व पाहणी होत असूनही, येथील पाच मजूर पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पोलिस यंत्रणा दोन दिवसांपासून पळून गेलेल्या मजुरांचा शोध घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com