Mumbai accident: मुंबईत भीषण अपघात, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोन जणांचा मृत्यू

Goragaon Bridge Accident: सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
Mumbai accident: मुंबईत भीषण अपघात, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोन जणांचा मृत्यू
Mumbai accidentsakal
Updated on

Mumbai Accident Latest Update: मुंबईमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गोरेगावमध्ये दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकून दुचाकी थेट वीस फूट खाली पडल्याने दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

वैभव रामदास गमरे (२८ वर्षे) आणि आनंद इंगळे (२१ वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांना समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वैभव आणि आनंद या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.