मुंबई : अखेर न्याय मिळाला, पत्नीच्या हत्येचा आरोपातून ते मृत्यूनंतर दोषमुक्त

Mumbai High Court
Mumbai High Courtsakal media

मुंबई : वडिलांवर झालेला हत्येचा आरोप हटविण्यासाठी (Murder allegation) मुलांनी केलेल्या याचिकेला (petition) यश आले असून मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) वडिलांना त्यांच्या मृत्यूनंतर निर्दोष जाहीर (Accused acquitted) केले आहे. न्या.एस.एस शिंदे आणि न्या.एस.पी तावडे यांच्या खंडपीठाने आरोपी उमेश सावंत (accused umesh sawant) यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त (free from life imprisonment) केले आहे. त्यांच्या वर पत्नीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. (Accused umesh sawant acquitted and free from life imprisonment)

Mumbai High Court
मंत्रालयात नोकरी करणाऱ्या कल्याणच्या तीन जणांना ओमिक्रॉनची बाधा

या आरोपात सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची सजा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी उच न्यायालयात अपील याचिका केली होती. मात्र सुनावणी प्रलंबित असताना नोंव्हेबर 2020 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी अपील याचिका कायम ठेवली होती.

न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेऊन सावंत यांना सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त जाहीर केले. अभियोग पक्षाने दाखल केलेले पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com