आदित्य ठाकरेंची वर्सोवा बीचवर 'क्लीन अप' मोहीम

आदित्य ठाकरेंची वर्सोवा बीचवर 'क्लीन अप' मोहीम

मुंबई -  पर्यावरणाचा मुद्दा घेऊन राजकारणात उतरू पाहणाऱ्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वर्सोवा बीचवर साफसफाई मोहीम राबवली. यावेळी आदित्य यांच्यासोबत युवा सेनेचे 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यादरम्यान आदित्य यांनी  स्वता:  तीन तास राबून वर्सोवा बिचवरील कचरा साफ केला.

गेल्या आठ महिन्यापासून आदित्य ठाकरे हे पर्यावरण विषयावर काम करत आहेत. या दरम्यान त्यांनी अनेकदा मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता .गेल्याच आठवड्यात आदित्य यांनी वर्सोवा बीचवर साफसफाई केल्या नंतर आज पुन्हा एकदा अफरोज शाह यांच्यासोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी घेऊन बीचवरील प्लास्टिक, थर्माकोल, ग्लास,पॉलिथिनच्या पिशव्या,प्लास्टिकचे ग्लास आणि इतर कचरा साफ केला. 

आदित्य ठाकरे गेल्या वर्षभरापासून पर्यावरण आणि समुद्र किनाऱ्यांची स्वछता या विषयावर काम करत आहेत. त्यांच्याच आग्रहामुळे राज्यात प्लास्टिक बंदी सारखा महत्वाचा कायदा करण्यात आला. या कायद्यानंतर आता आदित्य यांनी समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. आपण पर्यावरणाची काळजी घेतली तर पर्यावरण आपली काळजी घेईल. राज्यातील तरुणांनी स्वछता मोहिमेत सहभागी घ्यावा, यामुळे आपला शारीरिक व्यायाम होऊन आरोग्य उत्तर राहण्यास मदत होईल असे आवाहन ही आदित्य यांनी यावेळी केल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com