Aditya Thackeray: मुंबईकरांचा धनशक्तीला नाकारून जनशक्तीला कौल, आदित्य ठाकरेंनी विरोधकांना सुनावले

Aditya Thackeray Criticism: जनतेने धनशक्तीला नाकारून जनशक्तीला कौल दिला, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच महापालिकेचा निकाल गद्दारांच्या थोबाडीत लगावलेली चपराक असल्याचेही त्यांनी म्हटले.
Aditya Thackeray criticism on mahayuti

Aditya Thackeray criticism on mahayuti

ESakal

Updated on

​मुंबई : ‘तुमच्याकडे सत्ता होती, पैसा होता, यंत्रणा होती आणि निवडणूक आयोगही होता. चार वर्षे प्रशासक बसवून तुम्ही मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला; पण मुंबईच्या जनतेने धनशक्तीला नाकारून जनशक्तीला कौल दिला आहे,’ अशा कडक शब्दांत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. ५४ नगरसेवक फोडूनही जनतेने ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा निवडून दिल्याने हा निकाल म्हणजे गद्दारांच्या थोबाडीत लगावली गेलेली सणसणीत चपराक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com