Thane News: ३०० झाडांची बेकायदा कत्तल! सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर

NCP Sharad Pawar Group Anger Over Cutting Trees : आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल प्रकल्पासाठी वृक्षतोड करून प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. याबाबत शरदचंद्र पवार गटाने संताप व्यक्त केला आहे.
Administration ignored guidelines of cutting trees

Administration ignored guidelines of cutting trees

ESakal

Updated on

ठाणे : आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीत प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ फासल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिओ-टॅगिंगशिवाय सुमारे ३०० झाडांची निर्घृण कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सेवा रस्त्यावर वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com