

Mumbai
esakal
मुंबई: ऑपरेशन सिंदूरदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या अग्निवीर मुरली नाईकच्या कुटुंबीयांनाही भारतीय सैनिकांच्या कुटुंबीयांप्रमाणे लाभ मिळण्याबाबत कोणती पावले उचलली, त्याबाबत आदेश देऊनही अद्याप उत्तर सादर का केले नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती मंगळवारी (ता. २१) उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली. तसेच यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची ही शेवटची संधी आहे; अन्यथा कठोर पावले उचलू, असेही न्यायालयाने सुनावले.