

Boost to Smart Farming: Maharashtra Sanctions ₹30 Crore for Agri-AI
sakal
मुंबई : राज्यातील कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९'' च्या अंमलबजावणीसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीच्या विनियोगास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे.