ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा,अस्लम शेख यांचं पालिका आयुक्तांना पत्र

ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा,अस्लम शेख यांचं पालिका आयुक्तांना पत्र

मुंबई:  वर्षानुवर्षे एकाच विभागात, एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी  महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
 
शेख यांनी पत्रात म्हटले आहे की, ठराविक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम असताना बदलीपात्र असूनही महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचं चित्र मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेत सर्रास पहायला मिळतं.

अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी  कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधले अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करीत असल्याने अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने आणि काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचे दिसून येते.

त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांची बदली करावी. ही प्रक्रिया येत्या 15 दिवसांमध्ये पूर्ण करावे, असेही  शेख यांनी या पत्रात मागणी केली आहे.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Aslam Sheikh Municipal Commissioner iqbal singh chahal letter 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com