Barti : बार्टीत 'वारे' न वाहता गजभीयेची 'ज्योत' राहणार कायम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशासन संस्था (बार्टी)च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये हे पुन्हा महासंचालक म्हणून पुन्हा कायम राहणार आहेत.
dhammajyoti gajbhiye
dhammajyoti gajbhiyesakal
Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशासन संस्था (बार्टी)च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये हे पुन्हा महासंचालक म्हणून पुन्हा कायम राहणार आहेत.

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशासन संस्था (बार्टी)च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये हे पुन्हा महासंचालक म्हणून पुन्हा कायम राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात आलेली एक याचिका न्यायालयाने आज निकाली काढली असल्याने गजभिये यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सामाजिक न्याय विभागाने २४ जानेवारी रोजी जीआर काढून वरिष्ठ अधिकारी सुनील वारे यांची बार्टीच्या महासंचालक पदी नियुक्ती केली होती. तर विद्यमान महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्या पदावरून बाजूला केले होते. त्यामुळे या निर्णयाविरोधात गजभिये यांनी २७ जानेवारी रोजी त्या नियुक्तीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) आव्हान दिले होते. त्यात मॅटने वारे यांची नियुक्ती रोखून धरत गजभिये यांच्या बाजूने अंतरिम निकाल दिला होता. त्यामुळे वारे हे मॅटच्या निर्णयामुळे बार्टीत रुजू होऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली त्यामध्ये वारे यांची याचिका निकाली काढली. तसेच मॅटचा निर्णय तुमच्या विरोधात गेल्यास तुम्ही आणि गजभिये हे पुन्हा न्यायालयात येऊ शकता असा निर्वाळा दिला. वारे यांच्या बाजूने न्यायालयात अड. अभिजित देसाई यांनी बाजू मांडली तर गजभिये यांच्या बाजूने अड. प्रज्ञा तळेकर, माधुरी आय्यापन यांनी बाजू मांडली होती.

आजच्या मोर्चात विषय गाजणार

दरम्यान,बुधवारी, २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मांग - मातंग समाजाचा महामोर्चा येत असताना मुंबई उच्च न्यायालयाने वारे यांची याचिका निकाली काढल्याने या मोर्चामध्ये बार्टी विरोधातील रोष व्यक्त होण्याची शक्यता आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे. मॅटने वारे यांच्या विरोधात निकाल दिल्यापासून मातंग समाजामध्ये त्या विरोधात वातावरण तयार झाले होते. त्यामुळे मुंबईतील या मोर्चामध्ये बार्टीचे विभाजन करून मांग मातंग समाजासाठी आर्टी नावाची वेगळी संस्था स्थापन करावी ही प्रमुख मागणी केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुंबईतील मोर्चात हा विषय गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com