

Bhiwandi-Wada-Manor Highway
ESakal
भिवंडी : सात वर्षांपासून रखडलेल्या भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग; तसेच शिरसाड-वाशिंद महामार्ग यांच्या कामातील कथित भ्रष्टाचार, दिरंगाई आणि निकृष्ट दर्जाविरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने येत्या आठ दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत, तर कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार व सरचिटणीस नवनाथ भोये यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.