Palghar News: भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग सात वर्षांपासून रखडला; आठ दिवसांत काम न झाल्यास...; प्रशासनाला थेट इशारा कुणी दिला?

Palghar Highway News: सात वर्षांपासून भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग रखडलेला आहे. याविरोधात आता भूमिपुत्र एल्गारने आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाला अल्टिमेटम दिला.
Bhiwandi-Wada-Manor Highway

Bhiwandi-Wada-Manor Highway

ESakal

Updated on

भिवंडी : सात वर्षांपासून रखडलेल्या भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग; तसेच शिरसाड-वाशिंद महामार्ग यांच्या कामातील कथित भ्रष्टाचार, दिरंगाई आणि निकृष्ट दर्जाविरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने येत्या आठ दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत, तर कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार व सरचिटणीस नवनाथ भोये यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com