

Farmers Get Boost: Daytime Electricity for Irrigation Pumps Brings Major Relief
sakal
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील तब्बल १२ लाख ८२ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. त्यासाठी दररोज चार हजार ७७९ मेगावाॅट विजेचा पुरवठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री कृषिपंप चालवण्याच्या संकटातून सुटका होत आहे, असे ‘महावितरण’ने कळविले आहे.