चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!, शेलारांचा ठाकरे सरकारवर प्रहार

"कांजुरमार्गला कारशेड म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी"
Uddhav-Thackeray-Ashish-Shelar
Uddhav-Thackeray-Ashish-Shelar

मुंबई: मुंबई मेट्रो प्रकल्पावरुन भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार (asish shelar ) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. "मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. गेले चार महिने जपान सरकार (japan govt) निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला. वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला. श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे!" अशा शब्दात त्यांनी मेट्रो प्रकल्पावरुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (BJP leader asish shelar slam thakceray govt over metro project)

"मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.

Uddhav-Thackeray-Ashish-Shelar
'लसीच्या नावाखाली कांदिवलीतील रहिवाशांच्या शरीरात काय गेलं?'

"कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी"...खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय!. जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे?" असा सवाल शेलारांनी विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com