Mumbai BMC Election: भाजपचा उदय, काँग्रेसची घसरण! हिंदुत्वाचा मुद्दा तापवतानाच उत्तर भारतीयांशी सलगी

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेत भाजपने उत्तर भारतीयांना जवळ केल्याने टप्प्याटप्प्याने भाजपच्या जागा वाढल्याचे चित्र आहे. यामुळे निवडणुकीत त्याचा काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे.
BJP and Congress

BJP and Congress

ESakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : दोन दशकांपूर्वी मुंबई महापालिका म्हटलं की शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच सत्तेसाठी रस्सीखेच होत होती. शिवसेनेकडे ९०-९५ तर काँग्रेसकडे ७०-७५ जागांची बेगमी असायची. शिवसेनेचे राजकारण मराठी माणूस आणि हिंदुत्त्वाच्या भोवती फिरायचे, तर काँग्रेसची मदार अल्पसंख्याक आणि उत्तर भारतीयांवर असायची. मात्र, १९९७ पासून भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा तापवतानाच उत्तर भारतीयांना जवळ केल्याने काँग्रेसला सुरुंग लागला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने भाजपचा आलेख उंचावला असून, २०१७ च्या आकडेवारीनुसार ८२ जागा झाल्या, तर काँग्रेसची घसरण होऊन ३१ पर्यंत खाली आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com