

BMC
ESakal
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबई व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःची मतपेढी असलेल्या दलित आणि आंबेडकरवादी राजकीय पक्षांना कोणतीही प्रभावी कामगिरी करता आली नाही. २२७पैकी ९५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव होते. त्यात महिलांसाठी आठ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तरीही दलित आणि आंबेडकरी विचार घेऊन कार्यरत असलेल्या एकाही राजकीय पक्षाला या राखीव प्रभागांत उमेदवार निवडून आणता आला नाही.