मुंबई - मुंबई महानगरपालिकेची नवी प्रभाग रचना काल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची तातडीने महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. सकाळी या बैठकीची सुरुवात झाली असुन मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळ या बैठकीत राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता लागली आहे.
सध्या राज्यात इतर जिल्ह्यांसह मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे. बाजी मारण्यासाठी प्रत्येक पक्षाची चढाओढ पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्ये मुख्य आणि अटीतटीची लढत होईल असा अंदाज बांधला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील हालचालींना आता खऱ्या अर्थाने वेग आला असून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे ही लढत अटीतटीची होऊन शिवसेना आणि भाजपच्या (BJP) जागांमध्ये थोडक्या जागांचा फरक असेल तर सत्ता स्थापनेत मनसे हा पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.