Narali Pournima: एक नारळ दिलाय दर्या देवाला! कोळीवाड्यांमध्ये होड्या, नारळ सजावटीची धुम

Koliwada: नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केल्यावर त्याला नारळ वाहिल्यानंतर समुद्र शांत होतो. मासेमारी करायला गेलेल्या कोळी बांधवांचे रक्षण करतो. त्यामुळे कोळी समाजात उत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळत आहे.
Narali Pournima 2025
Narali Pournima 2025ESakal
Updated on

नवी मुंबई : सन..आयलाय..गो..आयलाय..गो नारली पूनवंचा..मन आनंद माव ना..कोल्यांच्या दुनियेला...या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरायला अवघा रायगडासह ठाणे, मुंबई आणि पालघरमधील कोळीवाडे सजले आहेत. नारळी पौर्णिमेच्या दिवासापासून पारंपारीक मासेमारीला सुरुवात होते. समुद्राला नारळ वाहयल्यानंतर उधाण कमी होते, आणि मासेमारीला गेलेल्या होड्यांचे समुद्रदेवता रक्षण करते अशी कोळी समाजाची समज आहे. त्यामुळे हा सण अगदी अबालवृद्धांपासून सगळे घटक सहभागी होतात. पारंपारीक वेशभूषेत मनसोक्त गाणे गात व नृत्य करीत नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com