Mumbai High court
Esakal
मुंबई : बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि तक्रारदार तरुणीतील नाते प्रेमावर आधारित असून, ते वासनेवर नाही. आता त्यांचे लग्न झाल्याने ते सुखाने संसार करीत आहेत, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने आरोपीविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करून त्याला दिलासा दिला. हा खटला पुढे सुरू ठेवल्यास दोघांनाही मानसिक त्रास सहन करावा लागेल, असे न्या. अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने नमूद केले.