Mumbai Local: दोन महिन्यांत ३० कोटी दंड वसूल, रेल्वेतील विनातिकीट प्रवाशांवरील कारवाईला यश

Raiway Administration Action: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. यामध्ये दोन महिन्यांत ३० कोटी दंड वसूल करण्यात आला आहे.
Railway ticket checking

Railway ticket checking

Esakal

Updated on

मुंबई : विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मोठा दणका दिला आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत तिकीट तपासणी पथकांनी चार लाख ३० हजार प्रकरणे उघडकीस आणून ३० कोटी १३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २.७५ लाख प्रकरणांतून १२ कोटी दोन लाख रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे दंडवसुलीत १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com