मुंबईत बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणाम

मुंबईत बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणाम

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी (ता.14) मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे; तर रायगड जिल्ह्यात सोमवार ते बुधवार हे दिवस काहीशी अशीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी अतिवृष्टीची शक्‍यता असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईतील तापमान 4 अंशांपर्यंत खाली आले आहे. शनिवारी मुंबईत कमाल तापमान 35 अंशांपर्यंत नोंदविण्यात आले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत कुलाबा येथे कमाल 31 अंश आणि किमान 26.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सांताक्रूझ येथे कमाल 31.7 आणि कमाल 25.6 अंश तापमान नोंदविण्यात आले. मुंबईत मंगळवारपर्यंत वातावरण अंशतः ढगाळ राहणार आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मंगळवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे; तर रायगड जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे. 

रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे. बुधवारीही वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह 100 मिमीपर्यंत पाऊस होऊ शकतो. गुरुवारी या दोन्ही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्‍यता असून, 204 मिमीपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. या दोन्ही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com