chandrashekhar bawankule
sakal
ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील सुमारे ४१२ हेक्टर वादग्रस्त जमिनीबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या जमिनीच्या अभिलेखात खासगी नावे नोंदविणारी फेरफार नोंद क्रमांक ९७५ रद्द करून पुन्हा "महाराष्ट्र शासन राखीव वने' अशी नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या जमिनीच्या मालकी आणि वनजमिनीच्या दर्जावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे.