
मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना देशातील जनतेने दिलेली ‘महात्मा’ ही पदवी सर्वोच्च पदवी आहे. या देशात फक्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोनच महात्मे असल्यामुळे भारतरत्न पुरस्काराने सन्मान करताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये, अशी भूमिका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.