

Baliraja Mofat Veej Yojana
ESakal
महाराष्ट्राच्या महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने'बाबत मोठी स्पष्टता समोर आली आहे. या योजनेचे लाभार्थी आणि त्यामागील अटींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मोठा खुलासा केला आहे. ही योजना कोणत्याही मर्यादेशिवाय सर्व कृषी ग्राहकांना लागू नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने यासाठी काही 'अटी आणि शर्ती' निश्चित केल्या आहेत. जेणेकरून योजनेचे फायदे फक्त लक्ष्यित आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील.