sakal sanman 2026 event
sakal
मुंबई - महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे आपले व्हिजन आहे. त्या अर्थव्यवस्थेत गरिबी नसेल, सर्वांना रोजगार मिळेल आणि प्रत्येकाची सर्व स्वप्ने पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सकाळ सन्मान’ कार्यक्रमात ते बोलत होते.