"दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण..."; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

हायकोर्टनं शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
shivsena uddhav thackeray criticizes BJP for thackeray family dynasticism maharashtra politics
shivsena uddhav thackeray criticizes BJP for thackeray family dynasticism maharashtra politics Sakal

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की, "दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण या परंपरेला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका" (Come to Dussehra gathering with enthusiasm Uddhav Thackeray appeal to Shiv Sainik)

shivsena uddhav thackeray criticizes BJP for thackeray family dynasticism maharashtra politics
Rahul Gandhi : "राहुल गांधी नैसर्गिक नेते त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही"

उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो गेल्या ६६ सालापासून त्यासंबंधीच्या केसमध्ये आम्हाला विजय मिळाला आहे. मी म्हणतो न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरलेला आहे. आता न्यायदेवतेनं आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रेमींना आणि माता-भगिनींना आवाहन करतो की, उत्साहात या...वाजत गाजत या...गुलाल उधळत या. पण शिस्तीनं या कुठेही आपल्या या तेजस्वी परंपरेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका.

shivsena uddhav thackeray criticizes BJP for thackeray family dynasticism maharashtra politics
Dussehra Melava : "अर्ज फेटाळून अधिकारांचा दुरुपयोग केला"; हायकोर्टानं BMCला फटकारलं

कारण इतर काय करतील त्याची आपल्याला कल्पना नाही. पण आपली परंपरा आहे की शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधीत्व करतो आहोत. या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशाबरोबरच परदेशात राहणाऱ्या बांधवाचंही याकडे लक्ष लागलं होतं. त्यामुळं या मेळाव्याला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका.

दसरा मेळाव्याकडे देशाबरोबरच जगाचं लक्ष

कारण इतर काय करतील त्याची आपल्याला कल्पना नाही. पण आपली परंपरा आहे की शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधीत्व करतो आहोत. या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशाबरोबरच परदेशात राहणाऱ्या बांधवाचंही याकडे लक्ष लागलं होतं. त्यामुळं या मेळाव्याला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका.

कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारवर

आमची शिवसेना वाढलेली आहे, परवाचा आमचा मेळावा हा फक्त शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टानं राज्य सरकारवर टाकली आहे. त्यामुळं राज्य सरकार सुद्धा याला जबाबदार असणार आहे आणि राज्य सरकार ही जबाबदारी पार पाडेल अशी आशा आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com