

Varsha Gaikwad
विनोद राऊत
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अधिकच उफाळली आहे. यासाठी जबाबदार धरून मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसमधील एका गटाने केली आहे. त्यामुळे दिल्लीदरबारी गायकवाड यांच्या तक्रारीचा पाढा वाचण्याची तयारी या गटाने केली आहे. दुसरीकडे गायकवाड गटाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.