आरएसएसच्या किती लोकांना मंत्री दरबारी ठेवले होते त्याची चौकशी करा - नाना पटोले

nana-patole.png
nana-patole.png

महाराष्ट्रात विरोधी पक्ष चुकीच्या मार्गाने चालला आहे. अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातातील बाहुली बनू नये. महाराष्ट्राची बदनामी विरोधी पक्षाकडून वारंवार होत आहे. हे चुकीचे आहे, लस ज्या पद्धतीने केंद्र राज्य सरकारला पुरवत आहे, त्या अनुषंगाने १२ वर्ष लागतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

वाटा आणि घाटा फडणवीस सरकार मध्ये होत होते. आरएसएसला हे लोक किती वाटा देत होते, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला. आज मी मुख्यमंत्र्यांना भेटून ह्या सर्व बाबत माहिती देणार आहे. आय पी एस, आय एस या अधिकाऱ्यांचा वापर कसा केला जातो हे सर्वांना माहीत आहे. आम्ही नेहमी सांगत आहोत की, राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. राजभवन भाजप कार्यालय झाले आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

कालचे नावडते अधिकारी आज भाजपला आवडीचे झाले आहेत हे कसं काय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. फडणवीस सरकार असताना, त्यांनी किती राजीनामे घेतले. आय पी एस अधिकाऱ्यांनी हे आरोप केले आहेत ही गंभीर बाब आहे पण याची चौकशी व्हायला हवी असे नाना पटोले म्हणाले.  फडणवीस सरकार असताना आरएसएसच्या किती लोकांना मंत्री दरबारी ठेवले होते त्याची चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com