लोकलचा भार कमी ठेवायचा असेल तर, दिवसाचे 24 तास कामाच्या भिन्न वेळा करण्याचा पालिकेचा विचार

लोकलचा भार कमी ठेवायचा असेल तर, दिवसाचे 24 तास कामाच्या भिन्न वेळा करण्याचा पालिकेचा विचार

मुंबई ः उपनगरी रेल्वेवरील भार कमी करायचा असेल तर कार्यालयांच्या वेळा भिन्न असण्याची गरज आहे तसेच त्यांच्या सुटीतही लवचिकता ठेवण्याची आवश्यकता आहे. आता किमान कोरोनाच्या आक्रमणामुळे मुंबई महापालिकेने याबाबत विचार सुरु केला आहे. 

अत्यावश्यक सेवेसाठी उपनगरी रेल्वेची वाहतूक सुरु झाली, पण त्यातील वाढती गर्दी चिंतेची बाब झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी सुरक्षित अंतराची गरज असते. मात्र सकाळच्या गर्दीच्यावेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईहून जाणाऱ्या उपनगरी रेल्वेत हे अशक्यच असते. आता पूर्ण कर्मचारी कार्यालयात नसतानाही हा प्रश्न गंभीर होत असल्याचे दिसत आहे. आता आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मुंबई महापालिका कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा विचार करीत आहे. 

मुंबई महापालिकेतील कर्मचारी कल्याण, विरार या उपनगरातून येत आहेत. त्यांना उपनगरी रेल्वेशिवाय पर्याय नाही. आता या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा एकावेळी करण्याऐवजी त्यात बदल केल्यास उपनगरी रेल्वेतील गर्दी नक्कीच कमी होऊ शकेल. सरकारी कार्यालयानी याची सुरुवात केल्यावर खाजगी कार्यालयाच्या वेळेतही बदल होऊ शकतील. मुंबई महापालिकेने या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. त्यांनी याबाबतचा विचार सुरु केला आहे आणि त्याची घोषणा लवकरच होईल, असे सांगितले जात आहे. 

अनेक कर्मचारी कल्याण तसेच विरारच्या पुढील ठिकाणहून येतात. मात्र कल्याण तसेच विरार पुढील उपनगरी रेल्वेची संख्या कमी आहे. त्यातही कल्याण तसेच विरारपुढील स्थानकातही मर्यादीत थांबे असल्याने गर्दी जास्त होते. त्यामुळे कार्यालयीन वेळात बदलांबरोबर रेल्वेच्या फेऱ्यातही वाढ करण्याची मागणी प्रवासी संघटना करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com