अजित पवारांनी बोलवली तातडीची बैठक, राज्यात लवकरच कडक निर्बंध

Ajit Pawar
Ajit PawarSakal

राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली आहे.

तिसऱ्या लाटेची क्षमता लक्षात घेता राज्यात काही ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास नियम आणखी कडक करणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी याआधी सांगितलं होतं. त्यानंतर अजित दादांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्वाची बैठक सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांची टास्क फोर्ससोबतही चर्चा सुरू आहे. सध्या राज्य सरका निर्बंध कठोर करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत आढावा घेण्यात येत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत कोरोना निर्बंधांबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई- पुण्यात शाळा बंद...तर, महाविद्यालयांचा आज निर्णय

मुंबईत पहिली ते नववीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 11वीचे वर्गही ऑनलाईन पद्धतीने सुरू असतील. पुण्यात अजित पवार आणि राजेश टोपे यांच्या बैठकीनंतर पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला. आज उच्चतंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत महाविद्यालयांचा निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांची काल आरोग्य विभाग, पालक संघटना आणि अन्य शिक्षणकर्मींसोबत बैठक पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com