
"जेव्हा शरद पवार केंद्र सरकार मध्ये होते तेव्हा त्यांनी टास्क फोर्सचे प्रमुख असताना याच सुधारणा केल्या होत्या, ज्या आम्ही केल्या आहेत." - देवेंद्र फडणवीस
मुंबई : दिल्लीच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी येऊन थांबले आहेत. शेतकरी नेत्यांच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चांच्या फैरी झडतायत. अशात शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'भारत बंद' देखील पुकारला गेलाय. महाराष्ट्रातून देखील महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तर 'भारत बंद'ला देखील पाठिंबा दिलाय. यावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि देशातील विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी २०१० च्या शरद पवारांच्या पत्राची देखील आठवण करून दिली. सोबतच ते म्हणालेत की, "जेव्हा शरद पवार केंद्र सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी टास्क फोर्सचे प्रमुख असताना याच सुधारणा केल्या होत्या, ज्या आम्ही केल्या आहेत". तर काँग्रेसच्या जाहीरनाम्या बाबत देखील फडणवीसांनी वाच्यता केली, फडणवीस म्हणालेत की, काँग्रेसने म्हटलं होत की, बाजार समित्यांचा कायदा बरखास्त करू. जीवनावश्यक वस्तू कायदा बरखास्त करू." त्यामुळे आता 'बेहती गंगा मैं हाथ धोना' हा प्रकार सुरु असल्याचं फडणवीस म्हणालेत.
महत्वाची बातमी : शरद पवारांचं २०१० मधील APMC कायद्याला समर्थन देणारं पत्र आणि त्यावरील संजय राऊतांचं उत्तर
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
मुंबईतील सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai
Interacting with Media at BJP Office, Mumbai#ModiWithFarmers https://t.co/vkEWaZkgFu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2020
devendra fadanavis took press conference about farmers protest in india and stand of mahavikas aaghadi