मुंबई : काल शिवसेनेच्या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी मुंबईत उत्तर सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांच्यावर हल्लाबोल केला, या सभेत बोलताना फडणवीस यांमा ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे जाहीर दर्शन घेतलं यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं.
ठाकरे सरकारच्या काळात फडणवीस म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी कधी विचार केला असेल का की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणं राजद्रोह होईल आणि ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे यांचा छळ करून हत्या केली त्याच्या कबरीवर माथा टेकवणे हा राजशिष्टाचार होईल, असदुद्दील ओवेसीने ओरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला आणि तुम्ही पाहत राहिलात, लाज बाळगा, घोटभर पाण्यात बुडून जीव द्या, असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.
पुढे फडणवीस म्हणाले की, ओवैसीनं ऐकावं औरंगजेबाच्या ओळखीवर कुत्रही फिरकणार नाही, आता भगवा फडकेल संपूर्ण हिंदुस्थानावर. शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांनी आपली तलवाऱ्या म्यान केल्या असतील पण आम्ही अद्याप म्यान केलेल्या नाहीत आम्ही थेटपणे मुकाबला करू ठोकून मुकाबला करु.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.