...म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत- नवाब मलिक
मुंबई: राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला, तो नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला आणि त्यावर सिताराम कुंटे यांनी केवळ सही केली, असा आरोप विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. अशाप्रकारचा आरोप करणं योग्य नाही. पण मी त्यांची भावना समजू शकतो. आता गुन्हा दाखल झाल्याने जवळच्या व्यक्ती अडचणीत येतील, म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरले आहेत आणि त्यामुळेच ते असे आरोप करत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.
"रश्मी शुक्लांचा अहवाल मी सार्वजनिक केला, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. रश्मी शुक्लांच्या पत्राचा आधार घेऊन दिल्लीत प्रेस घेऊन सरकारवर आरोप ते स्वत: करत होते. मुंबईतही त्यांनी प्रेस घेतली आणि बदल्यांमध्ये पैसे खाल्ले जातात असे सांगितले. केंद्रीय गृहसचिवांना व राज्यपालांनाही तेच भेटले. रश्मी शुक्लांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केले. रश्मी शुक्लांचा रिपोर्ट येईपर्यंत कुठल्याही अधिकार्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. नंतरच्या काळात काही बदल्या झाल्या असं ते सांगतात. पण मला त्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्र पोलीसमध्ये बदल्या या पोलीस बोर्डच्या अध्यक्षतेखाली होतात. पण त्यांना ते मान्य नसून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलं आहे", असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
"नवाब मलिक यांनी अहवाल फोडला असे फडणवीस बोलत आहेत. परंतु गुन्हा दाखल झाल्यावर ते का घाबरत आहेत? चोरी झाली नाही अशी बोंबाबोंब आता फडणवीस करत आहेत. अफवा पसरवून लोकांना बदनाम करत आहेत आणि आम्ही हे सारं सरकार वाचवण्यासाठी करतोय असा आरोप करत आहेत. पण आम्ही पुन्हा सांगतो की आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे", असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.