डोंबिवली: वाहतूक विभागाची रिक्षाचालकांवर कारवाई

200 हून अधिक रिक्षा चालकांकडून दंड वसुली
Dombivali police
Dombivali policesakal media

डोंबिवली : रिक्षा चालकांची (Rikshaw driver) मनमानी ही काही नविन नाही. गणवेश घाला, कागदपत्र जवळ बाळगा, वाहतूक नियम मोडणे (rule breaking) या सूचना वारंवार करूनही रिक्षा चालक त्याचे पालन करत नसल्याने गेल्या चार पाच दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी (traffic police) नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करत दंड वसुली करण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीत 200 हून अधिक रिक्षा चालकांवर करण्यात आली असून सुमारे अडीच लाखाची दंड वसुली (fine) करण्यात आली आहे.

Dombivali police
तळ्याची विटंबना करणाऱ्या तिघांना अटक

उप प्रादेशिक परिवहन विभाग, कल्याण व वाहतूक विभाग डोंबिवली यांच्यावतीने शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात सकाळ संध्याकाळ कारवाई करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगण्यात हयगय करणे, वाहनतळ सोडून प्रवाशी भाडे आकारणे, गणवेश न वापरणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ही कारवाई केली जात आहे.

परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण आणि डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळ पासून डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहनतळावरील रिक्षाचालकाकडील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये अनेक रिक्षाचालकांच्या परवान्याची तारीख संपूण अनेक महिने उलटले तरी आरटीओ कार्यालयातून त्याचे नुतनीकरण करून घेतलेले नाही, गणवेश अनेक जण वापरत नाही तर काहींनी भाड्याने रिक्षा चालविण्यास घेतली, मात्र त्यांच्याकडे कागदपत्रे च नव्हती असे रिक्षा चालक आढळून आले आहेत. चार ते पाच दिवसांत 200 हुन अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून अडीच लाखाच्या आसपास दंड वसुली करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com