
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सोसायट्यांना सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक त्रासले आहेत. पिवळसर रंगाचे, फेसाळलेले पाणी घरातील नळाला येत असून, वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली जात नव्हती. सोमवारी (ता. २८) पुन्हा दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना बाहेरून टॅंकर मागवावा लागत आहे. शिवाय सोसायटीच्या टाक्याही वारंवार साफ करून घ्याव्या लागत आहेत. यामुळे नागरिक कमालीचे त्रासले असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.