मुंबई : एखाद्या उपनगरात वीजपुरवठा तात्पुरता खंडित होणार असल्याचा अधिकृत संदेश उत्साही वीजग्राहक शहरभर आपल्या मित्रांना पाठवून देतात. त्यामुळे नंतर उडणारा प्रचंड गोंधळ टाळण्यासाठी ग्राहकांनी जबाबदारीने वागावे, असे सांगण्याची वेळ अदानी इलेक्ट्रिसिटीवर आली आहे.
अनेकदा काही मर्यादित ठिकाणचा वीजपुरवठा अमक्या दिवशी अमुक वेळात खंडित होणार असल्याच्या सूचना अदानीतर्फे ग्राहकांना पाठविल्या जातात. मात्र वीजग्राहक त्या सूचना इतर विभागांमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्रांना पाठवतात, त्या इतर ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणार नसतो. यातून उडणाऱ्या गोंधळामुळे अदाणीच्या ग्राहकसंपर्क विभागात हजारो लोकांचे दूरध्वनी येऊन बिकट प्रसंग उद्भवतो. त्यामुळे वीजग्राहकांनी असे संदेश ज्या विभागासाठी असतील त्या विभागाबाहेर पाठवू नयेत, असे आवाहन अदानीने केले आहे.
या गोंधळात अदाणीच्या कॉलसेंटरला अनावश्यक दूरध्वनी येतात, तसेच ग्राहकही कार्यालयांमध्ये येऊन विचारणा करतात. त्यामुळे ग्राहकांच्या तातडीच्या समस्या सोडविण्यात अडचणी येतात. वीज नेटवर्कची देखभाल करण्यासाठी नियोजनबद्ध रितीने काही काळ वीजपुरवठा बंद केला जातो. त्याबाबत ग्राहक सज्ज असावेत म्हणून त्यांना पूर्वसूचनाही दिली जाते. मात्र ग्राहकांनी अशा नोटिसा अन्य भागात पाठवू नये व जबाबदारीने वागावे, असे आवाहन अदाणी ने केले आहे. अधिक माहितीसाठी www.adanielectricity.com
dont send misleading messages adani electricity urges to customers
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.