'या सरकारला हा शेवटचा इशारा', आचार्य तुषार भोसले संतापले

'वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल'
tushar bhosale
tushar bhosaleesakal

मुंबई: कोरोना व्हायरसच्या साथीमुळे राज्य सरकारने मागच्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारीला (wari) बंदी घातली आहे. कोरोनाचा (corona virus) फैलाव होऊ नय़े, यासाठी राज्य सरकारने (maharashtra govt) हा निर्णय घेतला आहे. पण यामुळे काही वारकऱ्यांमध्ये (warkari) अस्वस्थतता आहे. सरकाराचा हा निर्णय त्यांना मान्य नाहीय. त्यांनी पायी वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Dont Warkaris from going to pandharpur tushar bhosale)

असंख्य वारकरी पायी वारी करणार असून पोलिसांनी अनेक वारकऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सरकारला ठणकावले आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी वारकऱ्यांच्या सोबत आहे, असे तुषार भोसले यांनी सांगितले.

tushar bhosale
सेक्सटॉर्शन प्रकरणात तिघांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

"राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक वारकरी आता पायी निघणार आहेत. शांत आणि संयमी वारकऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून सरकारने घाबरवू नये. आमचा या सरकारला हा शेवटचा इशारा आहे की, वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्यात या सरकारची होळी होईल" अशा शब्दात आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com