.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : इंडिया एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान भारत मंडपममध्ये युवक काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगने असभ्य गोंधळ घालून भारताची जागतिक स्तरावर नाचक्की केली. हे देशप्रेम नव्हे, तर हा देशद्रोह आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या आंदाेलनामुळे काॅँग्रेसचा देशद्राेही चेहरा उघड झाला आहे. काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागायला हवी, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.