Eknath Shinde: CM शिंदेंच्या कार्यकाळात तब्बल 'इतक्या' हजार शेतकऱ्यांनी केली आत्महत्या!

हतबल बळीराजा शेवटी जगाचा निरोप घेतो ही वस्तुस्थिती आहे
Eknath Shinde Tenure
Eknath Shinde TenureEsakal

Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ‘राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू’ अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र, विद्यमान सरकारच्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात (१ जुलै २०२२ ते ३० ऑक्टोबर २०२३पर्यंत) राज्यातील तब्बल तीन हजार ७२७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या ३० महिन्यांच्या काळात सहा हजार ९६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे.

Eknath Shinde Tenure
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Sada Sarvankar यांच्या नियुक्तीवर Aditya Thackeray यांची टीका

राज्यातील शेतकरी अतिवृष्टी तर कधी अवकाळी आणि कधी दुष्काळ, अशा संकटांमुळे पिचला आहे. दुसरीकडे शेतमालाला हमीभाव देखील नाही. सातबाऱ्यावर बॅंकेचा बोजा आणि खासगी सावकारांच्या कर्जाचा बोजा, त्यातच मुलीचा विवाह, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवताना त्याला तारेवरची कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून पुरेशा प्रमाणात मदत मिळत नाही आणि हतबल बळीराजा शेवटी जगाचा निरोप घेतो ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुखयमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर ३० जून २०२२ पर्यंत त्यांनी राज्याचा कारभार पाहिला. महाविकास आघाडी सत्तेत असताना ३० महिन्यांत (१ डिसेंबर २०१९ ते ३० जून २०२२) या काळात जवळपास सात हजार आणि विद्यमान सरकारच्या १५ महिन्यांच्या काळात जवळपास पावणेचार हजार शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे कोकण विभागात या काळात एकही आत्महत्या झालेली नाही. पण, चिंतेची बाब म्हणजे मागील चार वर्षांत अमरावती व छत्रपती संभाजी नगर विभागात सर्वाधिक आठ हजारांवर आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्यामागील अचूक कारणांचा वेध घेऊन ठोस उपाय काढल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Eknath Shinde Tenure
Ajit Pawar Vs Ekanth Shinde : तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे ? अजित पवारांचा थेट CM शिंदेंना सवाल

‘महाविकास’च्या अडीच वर्षांची स्थिती

१ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० : २७८९

१ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२२ : ४,१८०

एकूण शेतकरी आत्महत्या : ६,९६९

शिंदे सरकारच्या १५ महिन्यातील स्थिती

१ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ : १,४५२

१ जानेवारी ते ३० ऑक्टोबर : २,२९२

एकूण शेतकरी आत्महत्या : ३,७४४

विभागनिहाय शेतकरी आत्महत्या

विभाग - एकूण आत्महत्या

पुणे - ९१

नाशिक - १,३७५

छ. संभाजीनगर - ३,६४४

अमरावती - ४,४३६

नागपूर - १,२०२

एकूण १०,७४८

Eknath Shinde Tenure
Mumbai Accident: भीषण अपघात! वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर चार गाड्यांची धडक; 4 प्रवाशी गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com