Mumbai Ward Structure : मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाने बोलावली बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याच्या दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिका कामाला लागली आहे.
State Election Commission
State Election Commissionesakal
Summary

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याच्या  दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिका कामाला लागली आहे.

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याच्या  दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिका कामाला लागली आहे. गुरुवारी निवडणूक आयोग आणि पालिका प्रशासन यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नव्याने प्रभाग रचना व त्या अनुषंगाने तयारीबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून येत्या तीन - चार महिन्यांत निवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. 

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ मागील ७ मार्च रोजी संपला असून सध्या प्रशासकांकडून कारभार चालवला जातो आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारावर मुंबईतील वॉर्ड वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईतील २२७ असलेल्या वॉर्डसंख्येत ९ वॉर्ड वाढवण्यात आल्याने एकूण वॉर्डची संख्या २३६ गेली. त्यानुसार गेल्या ३० मे रोजी (ओबीसी आरक्षण वगळून) मुंबई महापालिकेने आरक्षण सोडत काढून प्रभार रचना जाहिर केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने राज्यात बंडखोर- भाजप सरकार स्थापन झाले.

या सरकारच्या काळात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला. त्यामुळे नव्याने सोडत काढण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार मुंबई महापालिकेने दुस-यांदा २९ जुलैला सोडत काढली. प्रभार जाहिर झाल्याने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले. मात्र बाळासाहेबांची शिवसेना -भाजप सरकारने हा निर्णय बदलून वॉर्डची संख्या पूर्वीप्रमाणे २२७ वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २३६ वॉर्डनुसार काढण्यात आलेल्या दोन्ही आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या. यामुळे पालिका निवडणूक लांबली आहे.

आता राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने २२७ वॉर्डनुसार म्हणजे २०११ च्या जनगणनेनुसार नव्याने वॉर्ड रचना निश्चित करून व त्यानुसार प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पालिका कामाला लागली आहे. गुरुवारी निवडणूक आयोगाने पालिका प्रशासनासोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत प्रभाग रचना व त्यावरील तयारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, हरकती सूचना आदी प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे फेब्रुवारी ते मार्च पर्यंत निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

आता तिस-यांदा आरक्षण सोडत

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २३६ वॉर्ड जाहिर झाल्यानंतर पालिकेने ३० मे रोजी सोडत काढली. त्यानंतर पुन्हा २७ जुलैला दुस-यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारने वाढलेल्या ९ वॉर्डचा निर्णय रद्द करून पूर्वीप्राणे २२७ वॉर्डनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. आता नगरविकास विभागाने २२७ वॉर्डनुसार नव्याने प्रभागरचना तयार करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा तिस-यांदा सोडत काढावी लागणार आहे. एका सोडतीसाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येतो. तसेच ४०० कर्मचारी नियुक्त करावे लागतात. पालिकेला हा ५० लाखांचा खर्च आता पुन्हा करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com