बदलापूर : पडघा येथील महापारेषणच्या वीजवाहिनीत सकाळी साडेदहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत सोमवारी वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा फटका कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरसह वज्रेश्वरी परिसरातील अनेक गावांना बसला. वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले, परंतु रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत व्होल्टेज कमी असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.