Bharat Bandh : भाजप नेते आशिष शेलार म्हणतात, "मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत"

Bharat Bandh : भाजप नेते आशिष शेलार म्हणतात, "मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत"

मुंबई : दिल्लीच्या वेशीवर शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमलेत. अशात आज शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून 'भारत बंद' पुकारला गेलाय. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी आंदोलन आणि आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'ला पाठिंबा असल्याने महाराष्ट्रात भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. दरम्यान, भाजप नेत्यांकडून आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' वर कडाडून टीका केली जातेय. भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी देखील आज पुकारलेल्या 'भारत बंद'ला कडाडून टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत शेतकरी बांधवाना मागील काही गोष्टींची आठवण करून करून दिली आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला? कामगारांना कुणी फसवलं? कामगारांना कुणी उध्वस्त केलं ? कोणी मालकांचे फायदे करुन दिले? माझ्या शेतकरी बांधवानो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!

farmers protest bharat bandh bjp leader ashish shelar targets Mahavikas aghadi

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com