

Farmers Compensation
ESakal
नवी मुंबई : विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनामध्ये शेकडो हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे; मात्र मोबदल्याची रक्कम अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत एक बैठक पार पडली असून शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाणार आहे.