डोंबिवली - ठाणे महानगरपालिकेच्या भंडार्ली डम्पिंगला पुन्हा आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून नागरिक हैराण झाले आहेत. भंडार्ली डम्पिंग बंद करण्यात आले आहे. मात्र येथील कचरा उचलण्याचे आश्वासन ठाणे महापालिका अद्याप पूर्ण करू शकली नाही. या डम्पिंगला दुसऱ्यांदा आग लागली असून 14 गावातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
भंडार्ली गावातील डोंगरावर ठाणे महापालिकेच्या वतीने घनकचरा प्रकल्प उभारला होता. मात्र यातील मशीन बिघाड होत असल्याने येथे कचऱ्याचे भले मोठे डोंगर तयार झाले होते. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई पसरत होती. शेतीचे देखील नुकसान होत आहे.
14 गावातील जनतेने सुरवाती पासून या प्रकल्पाला येथे विरोध केला होता. मात्र तरीही येथे हा प्रकल्प उभा राहिला. जनतेचा विरोध पाहता 25 ऑक्टोबर 2023 ला हे डम्पिंग बंद करण्यात आले. मात्र डोंगरावर कचऱ्याचा ढीग अद्याप तसाच आहे. कचरा उचलला गेला नसल्याने कचऱ्याने पेट घेतला आहे.
ठाण्यातील कचऱ्यात प्लास्टिक अधिक प्रमाणात असल्याने डोंगरावर धुरच धूर पसरला आहे. नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे यांसारखे त्रास होत आहेत. पालिका प्रशासन याकडे कधीलक्ष देते हे पहावे लागेल.
या सुरु असलेल्या आगीच्या सत्रांवरून मनसेचे नेते राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधार्यांना लक्ष केलं आहे. त्यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं आहे कि, ठाण्याचा कचरा... धूर व दुर्गंधी आमच्याकडे कशाला? भंडार्ली पेटलाय, डायघर डंपिंग पेटलाय... व दिवा डंपिंग पुन्हा सुरु झालाय, कल्याण ग्रामीण बदलतय? अशी एक्स पोस्ट करत त्यांनी टीकेची संधी सोडली नाही. त्यामुळे आता कल्याण ग्रामीण डम्पिंग मुक्त करायला शासन काय प्रयत्न करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.