वाशी : सरकारने चौथ्या टाळेबंदीत अनेक व्यवसायाला परवानगी दिली आहे. मात्र, फूल विक्रेत्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पुष्पहार, फूल विक्रते, पुष्पगुच्छ बनवणाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शहरातील धार्मिक स्थळे बंद असल्याने पुष्पहार विक्रेत्यांकडे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीही पैसे नाहीत. ऐरोलीतील दत्त मंदीर, सानपाडा येथील शंकराचे मंदीर, दिघा येथील साईबाबा मंदीर, आदी मंदिरासमोर फुल विक्रेते बसत होते. शहरात नियमित वाढदिवस, लग्नसमारंभ, देव पूजा, कार्यशाळा, शिबिरे तसेच हॉटेलमध्ये कायमच फुलांना मागणी असते. मात्र लॉकडाउनमुळे मोठा अर्थिक फटका विक्रेत्यांना बसला आहे. शहरात सुमारे ३०० च्या सुमारास पुष्पहार विक्रेत्यांची दुकाने आहेत. याशिवाय शहरात शेकडो फूल विक्रेते आहेत. मात्र टाळेबंदीमुळे त्यांच्यावर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून कोरोनामुळे दुकाने बंद ठेवण्यात आले आहे. दुकानामध्ये सात ते आठ जण काम करुन उदारनिर्वाह करत होतो. मात्र आता कामच थांबल्यामुळे काय करावे असा प्रश्न पडला आहे. तर पैसे देखील संपत आल्यामुळे आता कसे जगावे असा प्रश्न पडल्याचे फुल विक्रेता सुरेंद्र शर्मा यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.