Mumbai News: लाच प्रकरणी अधिकारी निर्दोष, १२ वर्षांनी निकाल; तपासात गंभीर त्रुटी, आरोप सिद्ध करण्यात सरकारला अपयश
Mumbai Bribe Case: एका मद्य व्यावसायिकाकडून माजी विक्रीकर अधिकाऱ्याने लाच मागितल्याचे समोर आले होते. मात्र या प्रकरणी १२ वर्षांनी निकाल लागला असून अधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मुंबई : तपासातील गंभीर त्रुटी आणि भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्यात सरकारला संपूर्ण अपयश आल्याचे निरीक्षण नुकतेच विशेष न्यायालयाने नोंदवले. तसेच माजी विक्रीकर अधिकाऱ्याची लाचखोरी प्रकरणात निर्दोष मुक्तता केली.