Arabian-Sea
Arabian-SeaFile photo

मुंबई: २०२५ पासून नळाला येणार समुद्राचे पाणी

धरणांसाठी पर्याय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.

मुंबई: मालाड मनोरी येथे प्रस्तावित असलेल्या समुद्राचे पाणी (sea water) गोडे करण्याच्या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी आज महानगर पालिका (BMC) आणि इस्त्राईली कंपनीत (Israel company) करार झाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थीतीत हा करार झाला असून धरणांसाठी पर्याय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. 2025 पासून या प्रकल्पातून मुंबईला शुध्द पाण्याचा (clean water) पुरवठा सुरु होईल असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे ही आपली जबाबदारी आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. (From 2025 people of mumbai can use sea water for drinking)

मनोरी येथे महानगर पालिका समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात दिवसाला 200 दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी तयार केले जाणार असून आवश्‍यकतेनुसार हा प्रकल्प 400 दशलक्ष लिटर पर्यंत वाढविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महानगर पालिकेने इस्त्राईलच्या आय.डी.ई वॉटर टेक्नोलॉजी या कंपनीची नियुक्ती केली आहे.

Arabian-Sea
'सर्व चाव्या फडणवीसांकडे तर मग पाठीत खंजीर का खुपसला?'

या कंपनी बरोबरच आज राज्य सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहात करार करण्यात आला. ही कंपनी 200 दशलक्ष लिटर पाणी निर्माण करण्याच्या प्रकल्पाचा अहवाल तयार करणार आहे. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बाल सिंह, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस .श्रीनिवास, इस्त्राईलचे महावाणिज्य दुत याकोव फिनकेलस्टाईन उपस्थीत होते.

Arabian-Sea
लसीच्या दोन डोसनंतर मुंबईत इतक्या लोकांना झाली कोरोनाची बाधा

किनारपट्टीवर प्रकल्प उभारावेत

धरणासाठी वृक्ष तोड, स्थलांतर होते. तंत्रज्ञानाची किंमत असते. पण,माणसाचं आयुष्य अधिक महत्वाचे आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा पर्याय पुढे आणला. पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पावसावर किती अवलंबून राहावे असा प्रश्‍न आहे.त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीवर असे छोटे छोटे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पाण्याचा फेरवापर

या प्रकल्पात प्रक्रिया केल्यानंतर निर्माण होणाऱ्या टाकावू पाण्याचाही फेरवापर झाला पाहिजे. बांधकामासाठी हे पाणी वापरणे शक्य आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावरील भारही हलका होईल असे, एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com