मुंबई - ‘मुलगी गेली, पण तिच्या मृत्यूनंतर आम्हालाही मरायला सोडले आहे. तिचे हक्काचे वेतन, विमा रक्कम आणि विविध भत्ते कायद्यानुसार कुटुंबाला मिळणे अपेक्षित होते. त्यातील एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही..सरकार आणि कंपनीने साधी संवेदनाही व्यक्त केलेली नाही,’ अशी खंत अपघातग्रस्त विमानातील अटेंडंट पिंकी माळी हिच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. सरकारकडे तातडीने आर्थिक मदत, विमा व थकीत वेतन देण्याची मागणी करतानाच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही माली कुटुंबीयांनी केली आहे..बारामतीत विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत पाच जणांचा मृत्यू झाला. यात पिंकीचा समावेश होता. तिचे वडील शिवकुमार माळी यांनी सरकार आणि विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत..‘मुलीच्या मृत्यूला १७ दिवस झाले तरी सरकारने कोणतीच मदत केलेली नाही. कंपनीही स्वतःच्या विमा प्रक्रियेत व्यग्र आहे; मात्र मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही,’ असे सांगून त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ‘मुलीच्या निधनानंतर घर चालवणे कठीण झाले आहे..दैनंदिन खर्च, सर्व जबाबदारी पिंकी सांभाळत होती. मी टॅक्सी चालवतो. दिवसाला ७०० ते ८०० रुपये मिळतात. त्यात नाश्ता, दूध, भाजीपाला यासाठीच पैसे संपतात. २२,५०० रुपये घरभाडे भरणे आता अशक्य झाले आहे,’ असेही त्यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.