महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची. हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा पेटलाय. यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळतायत. दरम्यान आता शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येतेय.
शेतजरी कर्जमाफी दोन टप्प्यात दिली जाणार आहे. यातील पहिला टप्पा, सध्याचं आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच मार्च 2020 च्या आधी होणार आहे. तर दुसरा टप्पा हा एप्रिल 2020 मध्ये होणार आहे.
कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी सरकारने टीम देखील नियुक्त केली आहे. सरकारने बँकांकडून शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती देखील मागवली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हे पथक नियमित आढावा घेत आहे.
महत्त्वाची बातमी : शुद्ध हवेसाठी मध्य रेल्वे बनवणार ऑक्सिजन पार्लर
त्यामुळे आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेताना पाहायला मिळतंय. आता याबाबत अधिकृत घोषणा कधी होणार याचीच शेतकरी वाट पाहतायत.
WebTitle : Government to give farmer loan wavier in two phases
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.