"राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये"; मनसेनं फटकारलं

मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
Bhagat Singh Koshyari mumbai
Bhagat Singh Koshyari mumbaibhagatsinh koshyari

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका भाषणात मुंबई शहराबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळं राज्यात तीव्र राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली असून राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये, अशा शब्दांत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. (governor should not be speak on what he does not know says MNS)

देशपांडे म्हणाले, ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, महाराष्ट्राचा आपल्याला इतिहास माहिती नाहीतर नको त्या गोष्टीत राज्यपालांनी आपलं नाक खुपण्याची गरज नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे. इथं बाकी लोक आले आणि स्वतःची प्रगती करुन घेतली. १०५ हुताम्यांमुळं मुंबई महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळं ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नाही तर नको त्या गोष्टीत त्यांनी नाक खुपसू नये, असं आमचं स्पष्ट मत आहे.

मनसे स्टाईलनं उत्तर देणार?

राज्यपालांना आम्ही पहिल्यांदा वॉर्निंग देतोय की, त्यांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये. इथे राज्यपाल म्हणून आला आहात तर आम्ही तुमचा आदर करतो. त्यांच्या पदाचा आदर करतो. गुण्यागोविंदानं त्यांनी महाराष्ट्रात रहावं. नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com