Harshvardhan Sapkal : ..हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Mumbai News : शेतकरी कर्जमाफीवर अर्थसंकल्पामध्ये एक शब्दही काढला नाही. ट्रिपल इंजिन सरकारचे नेते मोदी-शहा यांचे सतत गुणगान गात असतात. त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडून राज्यासाठी स्पेशल पॅकेज घेऊन यावे.
Harshvardhan Sapkal condemns government actions, stating they are 'salt on farmers’ wounds.
Harshvardhan Sapkal condemns government actions, stating they are 'salt on farmers’ wounds.Sakal
Updated on

मुंबई : ‘‘ कर्जमाफी देऊ असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही, हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे,’’ असा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com